Vimoh Tyagun Karam Phalancha
Sudhir Phadke
6:16श्रीरामचंद्रांना सावधान अशी सूचना देणारा लक्ष्मण जेव्हा स्वतःहाच भरतावर संतापणे धावून जाऊ लागला तेव्हा श्रीरामाने परत त्याला शांत केलं भरत रामाश्रमामध्ये आला वेड्यासारखी त्याने रामाच्या चरणांना मिठी घातली रामाने त्याला जवळ घेतला पुष्कळ प्रश्न विचारले भांबावून गेलेल्या भरतानी मोठ्या कष्टाने पित्याच्या निधनाची वार्ता त्यांना सांगितली सर्व आश्रमावरच दुःखाची छाया पसरली यथाकाळी श्रीरामाने वडिलांचे श्राद्ध केलं आणि आता भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला रामा माझ्या आईच्या मूढपणामुळं आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागलं राज्य तुमचं आहे सिंहासन तुमचं आहे आपण अयोध्याला परत चला राज्याभिषेक करून घ्या तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले दैवजात दुःखें भरतां दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकयी ना दोषी नव्हे दोषि तात राज्यत्याग काननयात्रा सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत वियोगार्थ मीलन होतें नेम हा जगाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जिवासवें जन्मे मृत्यू जोड जन्मजात दिसे भासते तें सारें विश्व नाशवंत काय शोक करिसी वेड्या स्वपिंच्या फळांचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तात स्वर्गवासी झाले बंधु ये वनांत अतर्क्य ना झालें काहीं जरी अकस्मात मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट एक लाट तोडी दोघां पुन्हा नाहिं गांठ क्षणिक तेंवि आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आंसु ढाळूं आतां पूस लोचनांस नको आंसु ढाळूं आतां पूस लोचनांस तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येंत हो तूं राजा रंक मी वनींचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ पितृवचन पाळून दोघे होऊं रे कृतार्थ मुकुटकवच धारण करिं कां वेष तापसाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरीं चार संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरीं चार अयोध्येस नाहीं येणें सत्य हें त्रिवार सत्य हें त्रिवार सत्य हें त्रिवार तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा